आपल्या देशाला अनेक संताच्या विचारांचा, त्यांच्या जिवनमूल्यांचा आधार लाभला. त्यामुळे आपल्यातील प्रत्येकामध्ये जो बोलण्यातील मवाळपणा आहे तो तिथून आल्याचे समजते. त्यामुळे काहीजण अध्यात्माशी जोडले राहता आहेत. म्हणून आपण 'ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झाला असे कळस' असं म्हणतोच ना ! त्याऐवजी असं म्हणायला काही हरकत नाही की, 'दिला उपदेश संतांनी, अन् अनेकजण पोहचले कळसावरी' अनेकजण जे महान व्यक्ती म्हणून प्रसिद्धस आले त्यांनी आपण संत विचारांमळे यापदी पोहचल्याचे मान्य केले.
ज्ञानदेवानंतर अनेक संत नावारूपाला आले, प्रत्येकाचे म्हणणे एकच होते पण ते सांगण्याची पद्धत वेगळी होती. मेहनत केल्याशिवाय आपल्या यश मिळणार नाही. जे हवे त्यासाठी प्रयत्न करायला हवे असे त्यांचे म्हणणे होते. त्याच संत परंपरेतील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते संत म्हणजे संत नरहरी महाराज ! नरहरी महाराजांबद्दल एक विचित्र कथा आहे. ते आधी शिवभक्त होते, वडीलांप्रमाणे त्यांनाही आध्यात्माची आवड होती, नित्यनियमाने ते शिवमंदिरात जाऊन पूजाअर्चा करत असत. नरहरी महाराज यांचा जन्म पंढरपुरात झाला होता. ते तिथे राहत होते, तरी भगवान विठ्ठलबद्दल त्यांच्या मनात कुठलीही श्रद्धावगैरे नव्हती. 'त्या काळ्याच तोंड पाहणार नाही' असेच त्याचे म्हणणे होते. त्यामुळे ते कधी विठ्ठल मंदिरात गेले नाही.
त्यांचा सुर्वणकाराचा व्यवसाय होता, त्यामुळे व्यावसायामुळे त्यांना एकदा शिव मंदिरात जावे लागले. पण तेव्हा ही ते डोळ्यावर पट्टी बांधून तिथे गेले. मात्र तेव्हा त्यांना हरीहर म्हणजे भगवान शिव आणि विष्णू हे दोन्ही एकच असल्याचा दृष्टांत करून देण्यात आला. त्यांनंतर ते पराधीन चित्ताचा मी मला या सोन्याचा काय उपयोग असे म्हणत, त्यांनी परोपकाऱ्याच्या दिशेने आपला व्यवसाय केला आणि ते भगवान विठ्ठलाच्या भक्ती लिन झाले.
त्यांनी अनेक अभंग रचले, अनेक भक्तांचा गोतावळा जमविला. जणू विठ्ठल नामाची शाळाच भरविली. ज्यांमध्ये संपूर्ण जातीपातीच्या समूदायाने भाग घेतला त्यांनी अनेक प्रबोधनात्मक कीर्तने केली, त्याच बरोबर ते अवघ्या सुवर्णकार समाजाचे भूषण झाले म्हणून त्यांची सर्वांनी स्तुतीही केली. 'नामा म्हणे नरहरी सोनार झाला अलंकार देवाचा !' अशा अनेक प्रवासातून ते शेवटी मोक्षपदाला गेले आणि भगवान विठ्ठलामध्ये लिन झाले अन् आज त्याच पंढरपुरात संत नरहरी महाराजांची समाधी आहे. तसे प्रत्येक संतांनी आपला भारतीय समाज सुधारण्याच्या दिशेने पाऊल टाकले. तेव्हा त्यांनी आपली जमात कोणती असा प्रश्न कधी केला. जो-जो आला त्याला मार्गदर्शन करणे एवढच काम त्यांनी कायम ठेवले. त्यांच्या प्रचार प्रसारातून अनेकांनी आपली दिशा बदलवली. व्यवहार करतांनाही प्रत्येक व्यवहार हा आपला देव आहे असेच त्यांचे म्हणणे होते.
जे जे संत आतापर्यंत झाले, त्यांनी आपल्या आताच्या पिढीची कोणत्या प्रसंगात काय गत होईल, याचा अंदाज (भाकीत) त्यांच्या कार्यकाळात केले होते. त्याचा अनुभव आज आपल्या पदोपदी आल्या शिवाय राहत नाही. ही किती महत्वाची गोष्ट आहे ना ! आपल्या पिढीबद्दल केलेली प्रत्येक भविष्यवाणी आज खरी ठरलेली दिसते. त्यामुळे चमत्काराला नमस्कार करणारे आपल्यातलेच काही जण, ज्यांनी आधुकितेचा बुरखे घातलेले असले तरी, तेही या संताच्या विचारांना मानतात हे विशेष !