'लक्ष्या' चटका लावून गेला
मराठी म्हणा ! हिंदी म्हणा ! अशा अनेक चित्रपटांमध्ये काही वेगळ्या व्यक्तीमत्वाचे आवलिये होऊन गेले. मुळात चित्रपट सृष्टीची सुरूवातच मराठी माणसाने केली. आणि त्यातही मराठीतले कलावंत हिंदीमध्येही आपलं अस्तित्व उमटवून गेले याबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे. त्यांचे विनोदी अभियन आजही लोकांना हसवून जातात हे सांगायची गरज नाही. तशा हुन्नरी कलावंतांची यादी फार मोठी आहे. हास्य कलावंत म्हणून स्व. शाहीर दादा कोंडके यांचे नाव घेतले जात होते, मात्र त्यांच्या निधनानंतर, मराठी सिनेसृष्टी जणू ओस पडली होती तेव्हा एक कलावंत आला, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्मला म्हणून त्याचे नाव लक्ष्मीकांत ठेवले असे तो स्वतः सांगत असे, पण त्याच्या येण्यानंतरचा तो काळ सिनेमा तयार करणाऱ्यांची दिवाळी करून गेला. तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि त्यानं जिंकून घेतल सारं... असचं म्हणावं लागेल. खरचं लक्ष्मीकांत बेर्डे हे नुसतं नाव वाचलं, ऐकलं तरी आपल्या तोंडावर हसू येणार हे गणित कसं ठरलेलं होत नाही का ? सिनेमा कोणाचा ? तर लक्ष्याचा असं म्हटलं की, प्रत्येक जण मग तो कोणी असो, आवर्जून टी.व्ही., पडद्यासमोर बसायचा! त्याचा तो वेगळा आवाज, अडखळत बोलण्याची ती वेगळी तऱ्हा, सगळ्यांना आपल्यात मिसळून घेण्याचे कसब, त्याचे एका मागून एक असे अनेक सिनेमे आले पण त्यात हास्या शिवाय कोणतेही सारखेपण नव्हते. प्रसिद्धी असूनही आपला साधेपणा टिकवण हे या आवलिया विदूषकाकडे असणारी सर्वात मोठी देणगी होती. अस म्हणायला काही हरकत नाही. त्याने कदाचित दोन तीन दशके सर्वांच्या मनामनांवर अधीराज्य गाजविले, त्यात फक्त हास्य अभिनेता म्हणून त्याला ओळख मिळाली असली तरी, काही गंभीर विषयाच्या सिनमांमध्येही त्याने कसदार अभिनय केला. स्व. दादा कोंडके यांच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जागा मिळविणारा तो एकच ! आजही दोघेच हास्यसम्राट म्हणून ओळखले जातात. पण लक्ष्या सर्वांच्या गळ्यातील ताईत झाला होता, असं त्याचे वर्णन केलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही...! सचिन पिळगावकर - लक्ष्या, अशोक सराफ-लक्ष्या या जोडीनं आणि सचिन अशोक-लक्ष्या या तिघांच्या तिकडीन चांगलाच हास्य धुमाकूळ घातला. चांगलीच बनवाबनवी केली. विशेष म्हणजे लोकांनी त्याला या सिनेमामध्ये स्त्री भूमिकेत ही स्वीकारले, नव्हे डोक्यावर घेतले. प्रिया अरूण-लक्ष्या ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यात जमली पण... दुर्देवाने ती टिकली नाही.. लक्ष्या सिनेमात एखाद्या क्षणी जर रडला तर अवघ्या सिनेमागृहातच नव्हे तर टि.व्ही. समोर बसणाऱ्या प्रेक्षकांच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नव्हते. 'लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन' ही बातमी अचानक सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली, असं कस शक्य आहे ते !, असं कस झालं !, तो तर काही आजारीही नव्हता!, असेच पहिल्यांदा बातमी ऐकणाऱ्यांचे उद्गार होते. मात्र आपला तो बहुरूपी लक्ष्या १६ डिसेंबरच्या त्या गुरूवारी हस्य सृष्टीला चांगलाच उपवास लावून गेला. कोणाचा विश्वासच बसत नव्हता अर्थात तो आजही बसत नाही, आपल्या वेगळ्या शैलीतून, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका हास्यसम्राट म्हणविणारा 'लक्ष्या खरचं चटका लावून गेला' नाही का ? आजही त्याचा सिनेमा लागला की तो आपल्या समोर जिवंत होतो. त्याला वाहिलेली ही भावपूर्ण शब्द श्रद्धांजली...!
तो लक्ष्या स्मरणात राहील
धुमधडाक्यात आला होता,
सर्वांच्या मनात राहीला होता,
उरला नाही कोणी हास्यसम्राट आता,
सर्वांचा लक्ष्या पुन्हा दिसणार नाही,
दादा गेले, मेहमूद गेले, गेले जॉनी वॉकर,
मात्र तो गेल्याने ताटातली कोरडी झाली भाकर,
कोण जाणे देवा तुझ्या मनात होते काय ?
अवलिये असे तुलाही भावतात काय ? चटका लावून गेला, असच सारे म्हणाले
बहुरूपी अस्तित्व त्याचे, तो 'लक्ष्या स्मरणात राहील, दर्शन एकदा होता तो हसवून जाईल.. पुन्हा एकदा सर्वांना हसवून जाईल..
मराठी म्हणा ! हिंदी म्हणा ! अशा अनेक चित्रपटांमध्ये काही वेगळ्या व्यक्तीमत्वाचे आवलिये होऊन गेले. मुळात चित्रपट सृष्टीची सुरूवातच मराठी माणसाने केली. आणि त्यातही मराठीतले कलावंत हिंदीमध्येही आपलं अस्तित्व उमटवून गेले याबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे. त्यांचे विनोदी अभियन आजही लोकांना हसवून जातात हे सांगायची गरज नाही. तशा हुन्नरी कलावंतांची यादी फार मोठी आहे. हास्य कलावंत म्हणून स्व. शाहीर दादा कोंडके यांचे नाव घेतले जात होते, मात्र त्यांच्या निधनानंतर, मराठी सिनेसृष्टी जणू ओस पडली होती तेव्हा एक कलावंत आला, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्मला म्हणून त्याचे नाव लक्ष्मीकांत ठेवले असे तो स्वतः सांगत असे, पण त्याच्या येण्यानंतरचा तो काळ सिनेमा तयार करणाऱ्यांची दिवाळी करून गेला. तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि त्यानं जिंकून घेतल सारं... असचं म्हणावं लागेल. खरचं लक्ष्मीकांत बेर्डे हे नुसतं नाव वाचलं, ऐकलं तरी आपल्या तोंडावर हसू येणार हे गणित कसं ठरलेलं होत नाही का ? सिनेमा कोणाचा ? तर लक्ष्याचा असं म्हटलं की, प्रत्येक जण मग तो कोणी असो, आवर्जून टी.व्ही., पडद्यासमोर बसायचा! त्याचा तो वेगळा आवाज, अडखळत बोलण्याची ती वेगळी तऱ्हा, सगळ्यांना आपल्यात मिसळून घेण्याचे कसब, त्याचे एका मागून एक असे अनेक सिनेमे आले पण त्यात हास्या शिवाय कोणतेही सारखेपण नव्हते. प्रसिद्धी असूनही आपला साधेपणा टिकवण हे या आवलिया विदूषकाकडे असणारी सर्वात मोठी देणगी होती. अस म्हणायला काही हरकत नाही. त्याने कदाचित दोन तीन दशके सर्वांच्या मनामनांवर अधीराज्य गाजविले, त्यात फक्त हास्य अभिनेता म्हणून त्याला ओळख मिळाली असली तरी, काही गंभीर विषयाच्या सिनमांमध्येही त्याने कसदार अभिनय केला. स्व. दादा कोंडके यांच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जागा मिळविणारा तो एकच ! आजही दोघेच हास्यसम्राट म्हणून ओळखले जातात. पण लक्ष्या सर्वांच्या गळ्यातील ताईत झाला होता, असं त्याचे वर्णन केलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही...! सचिन पिळगावकर - लक्ष्या, अशोक सराफ-लक्ष्या या जोडीनं आणि सचिन अशोक-लक्ष्या या तिघांच्या तिकडीन चांगलाच हास्य धुमाकूळ घातला. चांगलीच बनवाबनवी केली. विशेष म्हणजे लोकांनी त्याला या सिनेमामध्ये स्त्री भूमिकेत ही स्वीकारले, नव्हे डोक्यावर घेतले. प्रिया अरूण-लक्ष्या ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यात जमली पण... दुर्देवाने ती टिकली नाही.. लक्ष्या सिनेमात एखाद्या क्षणी जर रडला तर अवघ्या सिनेमागृहातच नव्हे तर टि.व्ही. समोर बसणाऱ्या प्रेक्षकांच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नव्हते. 'लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन' ही बातमी अचानक सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली, असं कस शक्य आहे ते !, असं कस झालं !, तो तर काही आजारीही नव्हता!, असेच पहिल्यांदा बातमी ऐकणाऱ्यांचे उद्गार होते. मात्र आपला तो बहुरूपी लक्ष्या १६ डिसेंबरच्या त्या गुरूवारी हस्य सृष्टीला चांगलाच उपवास लावून गेला. कोणाचा विश्वासच बसत नव्हता अर्थात तो आजही बसत नाही, आपल्या वेगळ्या शैलीतून, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका हास्यसम्राट म्हणविणारा 'लक्ष्या खरचं चटका लावून गेला' नाही का ? आजही त्याचा सिनेमा लागला की तो आपल्या समोर जिवंत होतो. त्याला वाहिलेली ही भावपूर्ण शब्द श्रद्धांजली...!
तो लक्ष्या स्मरणात राहील
धुमधडाक्यात आला होता,
सर्वांच्या मनात राहीला होता,
उरला नाही कोणी हास्यसम्राट आता,
सर्वांचा लक्ष्या पुन्हा दिसणार नाही,
दादा गेले, मेहमूद गेले, गेले जॉनी वॉकर,
मात्र तो गेल्याने ताटातली कोरडी झाली भाकर,
कोण जाणे देवा तुझ्या मनात होते काय ?
अवलिये असे तुलाही भावतात काय ? चटका लावून गेला, असच सारे म्हणाले
बहुरूपी अस्तित्व त्याचे, तो 'लक्ष्या स्मरणात राहील, दर्शन एकदा होता तो हसवून जाईल.. पुन्हा एकदा सर्वांना हसवून जाईल..